जव्हार तालुक्याची माहिती..
Jawhar taluka म्हणजेच निसर्गासोबतच अतिशय जुना इतिहासाचा वारसा लाभलेला तालुका, महाराष्ट्रातील आपल्या पालघर जिल्यातील Jawhar ला पालघर जिल्ह्यातील jawhar Hill Station किंवा पालघर जिल्ह्याचे ‘महाबळेश्वर’ असेही संबोधले जाते.
जव्हार हे एक ठिकाण आपल्या पालघर जिल्यातील निसर्गाच्या सौंदर्याचे सर्वांत उत्तम उदाहरण आहे तसेच इथे अनेक मानवनिर्मित आकर्षक ठिकाणे देखील आहेत. जव्हारमधे असंख्य नयनरम्य ठिकाणे आहेत ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले आणि मुंबईपासून सुमारे 165 व पालघर पासून सुमारे 68 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी असलेले आल्हाददायक हवामान आणि सुंदर निसर्ग सौंदर्य लाभले असल्याने वर्णन करण्यासाठी शब्दांच्या पलीकडे आहे. जव्हारला अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत जे आपल्याला 14 व्या शतकाच्या इतिहासात घेऊन जातात.जव्हार करांनी आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. जव्हार हे वारली चित्रांसाठी प्रसिद्ध आहे.
येथील तारपा नाच हे सांस्कृतिक नृत्य ( Tarpa dance ) सुप्रसिद्ध आहे.
जव्हारला जयविलास राजवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श झालेले शिरपामाळ, दाभोसा धबधबा, कालमांडवी धबधबा, हनुमान पॉइंट तसेच येथील संस्कृतीचा अनुभव घेता येतो.
Jawhar Taluka Area
जव्हार हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक तहसील आहे. जनगणना 2011 च्या जनगणना माहितीनुसार जव्हारची एकूण लोकसंख्या 1,40,187 आहे. तसेच जव्हार चे क्षेत्रफळ 620.6 किमी आहे
जव्हारचा इतिहास
Jawhar taluka ला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: जातीने सुरतेवर स्वारी करण्यास निघाले असता छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले. त्यांना जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी जव्हारच्या मुकणे राजांची सदिच्छा भेट घेतली. जव्हारचे राजा विक्रमशहा मुकणे यांनी. शिवाजी महाराजांचे मोठे स्वागत केले.जव्हार राज्याची स्थापना राजा जयाबा मुकणे यांनी 1343 मध्ये केली होती, जव्हार ही राज्याची राजधानी होती. हे राज्य अनेक स्थित्यंतरांमधून गेले आणि 1947 मध्ये भारतीय संघराज्यात सामील होईपर्यंत सहाशे वर्षांहून अधिक काळ टिकले. ब्रिटिश राजवटीत, एक रियासत म्हणून, हे राज्य Bombay presidency चा एक भाग होते री. राजा यशवंत राव मुकणे 1947 मध्ये भारतीय संघराज्यात औपचारिक एकत्रीकरणापूर्वी जव्हारचा शेवटचे शासक होते.
Jawhar taluka हे असे ठिकाण आहे जे वर्षभर आपल्याला निसर्गच्या सौंदर्याचा आनंद देत राहते. कारण जव्हारचे हवामान वर्षभर आल्हाददायक राहते, ज्यामुळे ते फिरण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण बनते.
पण पावसाळ्यात येथील निसर्गाच्या सौंदर्याला बहर येतो. सगळीकडे येणारी हिरवळ, dabhosa waterfall व kalmandavi waterfall he दोन्ही jawhar waterfall चे उंचावरून पडणारे पाणी हे बघताना भान हरवून जाते.
दाभोसा हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील,जव्हार तालुक्यातील एक बारमाही धबधबा आहे. सुमारे ३०० फूट उंचीचा हा धबधबा जव्हारपासून २० किमी अतरांवर आहे.[१]आणि मुंबई पासून १५० किमी अंतरावर आहे.हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत कडय़ावरून कोसळणारी दाभोसाची पांढरीशुभ्र धारा पाहणे हा खरोखरच अनोखा अनुभव असतो. पायवाटेने तोल सांभाळत, जरा घसरत, दरीत उतरल्यानंतर काना-मनात भरून राहतो तो धबधब्याच्या धारेचा धीरगंभीर नाद, ओंकाराच्या अनाहत नादाशी नातं सांगणारा तो नाद नंतरही कानात गुंजत राहतो.
शिर्पामाळ
3 शतकांपेक्षा ही जुने असे हे शिल्प शिवरायांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. डोंगराच्या कडेवर असल्यामुळे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या भागाचा वापर केला जात असे. या भागातून संपूर्ण जव्हार शहरावर दृष्टीक्षेप टाकता येतो. सुरतच्या दिशेने कूच करताना शिवरायांनी याच भागत थांबून विश्रांती घेतली होती. जव्हारचे त्यावेळचे राजे पहिले विमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जव्हारमध्ये स्वागत केले तेच हे ऐतिहासिक स्थळ. हिरव्यागार टेकडीवर फडकणाऱ्या भगव्याचे दृष्य अत्यंत सुंदर दिसते. जव्हारमध्ये अजून बरीच पर्यटन स्थळे आहे ज्यामध्ये दक्षिणमुखी मारूती मंदिर, वर्षभर सतत वाहणारा काळ मांडवी धबधबा, सुंदर आणि शांत खदखद तलाव, शिवरायांनी बांधलेला भोपाटगड किल्ला यांचा समावेश होतो.
जयविलास राजवाडा
जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे. आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूटस साठी केला गेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते.
हनुमान पॉइण्ट
शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 1 कि. मी. अंतरावर एक हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉइण्टला हनुमान पॉइण्ट असे म्हणतात. तिन्ही बाजूने वेढलेली खोल दरी, दाट जंगले, जवळच्या राजविलास राजवाड्याची प्राचीन घुमटे, दूरवर दिसणारा ऐतिहासिक शहापूर माहोलीचा किल्ला आणि मोकळे आकाश असे नयनरम्य दृष्य येथून दृष्टीस पडते. रात्रीच्यावेळी येथून दिसणारा, कसाऱ्याच्या घाटातून जाणऱ्या ट्रेनचा प्रकाश एक वेगळाच अनुभव देऊन जातो.
सनसेट पॉइण्ट
जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमी वर हा पॉइण्ट आहे. जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला ‘धनुकमळ’ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणू जवळच्या महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्य किरणे पाहण्याचा
👍
ReplyDelete